Wednesday 7 October 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१ ते२५ (अभंग ४२ते ५१) **********

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , २१ ते२५ (अभंग ४२ते ५१) 
*********


आंधारु कोंडुनि घरीं । घरा पडसायी न करी । तैं आंधार इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ? ॥ ७-२१ ॥

अंधार आणून 
घरात कोंडला 
त्यानी जर केला 
ना अंधार ॥४२
तर त्या अंधारा 
म्हणता अंधार 
अंधार अक्षर 
व्यर्थ होय ॥४३

वो जावों नेदी जागणें । तये निदेतें नीद कोण म्हणे । दिवसा नाणी उणें । तैं रात्रिचि कैंची ॥ ७-२२ ॥ 

हाका मारण्यास 
होकार जी देते 
म्हणावे निद्रेते  
काय निद्रा ॥४४
दिवसा आणते 
जी काही उणे 
रात्रीला म्हणणे 
रात्र काय ॥४५

तैसें आत्मा अज्ञान असकें । असतां तो न मुके । तैं अज्ञान शब्दा लटिलें । आलेंच कीं ॥ ७-२३ ॥ 

तैसे या आत्म्यास 
अज्ञान असता 
ज्ञाना न मुकत
तोच जरी ॥४६
अज्ञान लटका 
शब्द हा होईल 
व्यर्थ ची जाईल 
नाम त्याचे ॥४७

येर्हवी तरी आत्मया । माजीं अज्ञान असावया । कारण म्हणतां न्यावा । चुकी येईल कीं ॥ ७-२४ ॥ 
आणिक येर्‍हवी
तरी या आत्म्याते
अज्ञान वसते 
म्हणे कोणी ॥४८
ऐसे हे म्हणणे 
पाहता तर्काने 
चूक येणे माने 
ठरलेली ॥४९

अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची खाणी । आतां दोहीं मिळणी । येकी कैसी ? ॥ ७-२५ ॥

अज्ञान म्हणजे 
तमाची मिळणी 
प्रकाशाची खाणी 
ज्ञान असे ॥५०

प्रकाश अंधार
वसे एक साथ 
अहो ही तो बात 
अशक्यचि॥५१ 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...