Sunday 5 April 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज् ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या ४१ रे ४३ (अभंग ७६ ते८२ ) चतुर्थ प्रकरणं संपूर्णम्




 अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज् ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या ४१ रे ४३ (अभंग ७६ ते८२   ) ****************************************************************************

निदेचें नाहींपण । निमालियाहि जागेंपण ।
असिजे कां नेण । कोणी न हो‍ऊनि जैसें ॥ ४-४१ ॥

 ४१
सरुनिया निद्रा 
येता जागेपण 
तयाचे स्मरण 
कोण ठेवी ॥ ७६ 

जागृती चे भान 
असे क्षण क्षण 
सहज व्यापून 
अस्तित्वाला ॥ ७७


कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे ।
तो नेलियां म्हणिजे । तेणेंविण ॥ ४-४२ ॥

 ४
जया भूमीवर 
ठेवी यला कुंभ 
तियेस सकुंभ 
म्हणविते ॥ ७८

नेताच तो कुंभ 
परी तो तेथून 
भूमी कुंभाविन 
म्हणतात ॥ ७९


परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग ।
ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥ ४-४३ ॥

 ४३
ठेवणे आणिक 
कुंभ उचलणे 
क्रियेचे घडणे 
झाले नाही ॥ ८०

तरी त्या भूमीस 
का घट सहित 
वा घट रहित 
म्हणतात ? ॥ ८१

तद्वत आत्मा 
आहे नाही विन
केवळ असून 
राही येथे.  ॥ ८

 ॥इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्‍अमृतानुभवे ज्ञानाज्ञानभेदकथनं नाम चतुर्थ प्रकरणं संपूर्णम् ॥

  

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...