अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ८१ते ८५, (अभंग १७८ते१८६ )
*******
अंवसेचेनि चंद्रबिंबें । निर्वाळिलिये शोभे । कां मांडलें जैसे खांबे । शशविषाणाचे ॥ ७-८१॥ ।
चंद्र अवसेचा
जर का देईन
सुंदर चांदणं
शोभीवंत ॥१७८
अथवा सशाच्या
डोईच्या शिंगांनी
मंडप बांधूनी
घेई कोणी ॥१७९
८२
नाना गगनौलाचिया माळा । वांजेच्या जालया गळा । घापती तो सोहळा । पाविजत असे ॥ ७-८२ ॥
आकाश फुलांच्या
नानाविध माळा
मिरवितो गळा
वंध्या पुत्र ॥१८०
८३
आणून कांसवीचें तुप । भरू आकाशाचें माप । तरी साचा येती संकल्प । ऐसे ऐसे ॥ ७-८३ ॥
कोणी का आणून
कासवीचे तूप
आकाशीचे माप
भरू जाय ॥१८१
तरीच संकल्प
अज्ञान मागचा
होता रे साचा
पूर्णपणे ॥१८२
84
आम्हीं येऊनि जाऊनि पुढती । अज्ञान आणावें निरुती । तें नाहीं तरी किती । वतवतूं पां ॥ ७-८४ ॥
आम्ही पुन्हा पुन्हा
येऊन जाऊन
अज्ञान बोलून
सांगू जावे ॥१८३
नये ची बोलता
सिद्ध वा करता
तर मग बाता
कशाला या ॥१८४
85
म्हणोनि अज्ञान अक्षरें । नुमसूं आतां निदसुरें । परी आन येक स्फुरे । इयेविषयीं ॥ ७-८५ ॥
म्हणुनी अज्ञान
बोलण्या अक्षरे
जेव्हा न स्फुरे
यावरती ॥१८५
तरी एक आण
तर्क येथ उपजे
म्हणूनी बोलीजे
तुम्हा प्रति ॥१८६
*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
**************
No comments:
Post a Comment