अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ९१ते ९५, (अभंग १९८ते२०८ )
🌺🌺🌺🌺
भूमीवेगळीं झाडें । पाणी घेती कवणीकडे । न दिसती आणि अपाडें । साजीं असती॥ ७-९१ ॥
तरी भरंवसेनि मुळें । पाणी घेती हें न टळें । तैसें अज्ञान कळें । दृष्यास्तव ॥ ७-९२ ॥
चेइलिया नीद जाये । निद्रिता तंव ठाउवी नोहे । परी स्वप्न दाऊनि आहे । म्हणों ये कीं ॥ ७-९३ ॥
म्हणोन वस्तुमात्रें चोखें । दृश्य जरी येव्हडें फांके । तेव्हां अज्ञान आथी सुखें । म्हणों ये कीं ॥ ७-९४ ॥
अगा ऐसिया ज्ञानातें । अज्ञान म्हणणें केउतें । काय दिवो करी तयातें । अंधारु म्हणिपे ? ॥ ७-९५
🌳🌳🌳
91
भुमीतून वृक्ष
पाणी घे शोषून
येतसे दिसून
पाहताना ॥१९८॥
वृक्षाची पालवी
पाहता कळते
पाणी ते मिळते
तयालागि॥१९९
92
येणेवरी कळे
मातीतील पाणी
वृक्षाच्या जीवनी
आधार ती ॥२००
तैसेचि अवघे
दृश्य हे पाहून
अज्ञान कळून
येई इथे॥२०१
93
जागृतास नाही
निद्रेची माहिती
निद्रितास रिती
निद्रेची वा॥२०२
परी जागृतीत
स्वप्न आठवती
तयाने ती पुष्टि
होय निद्रे ॥२०३
94
तयापरी पाही
शुद्ध वस्तू ठायी
दृश्य पसाराही
असेचि ना ॥२०४
तर मग तिथे
अज्ञान असते
म्हणता हे येते
नाही काय॥२०५
95
तया या प्रश्नाला
उमटे उत्तर
सिद्धांता सकट
असे पाही ॥२०६
अगा हे बोलणे
अवघेचि ज्ञान
तयाला अज्ञान
म्हणावे का?॥२०७
करतो प्रकाश
सार्या या जगास
अंधार तयास
म्हणावे का?॥२०८
🌾🌾🌾
No comments:
Post a Comment