अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , ५१ ते ५५ , (अभंग ११४ ते ११३)
तैसें कारण अभिन्नपणें । कार्यही अज्ञान होणें । तें अज्ञानचि मा काय कोणें । घेपे देपे ॥ ७-५१ ॥
आतां घेतें घेइजेतें ऐसा । विचारु नये मानसा । तरी प्रमाण जाला मासा । मृगजळींचा ना ? ॥ ७-५२ ॥
तंव प्रमाणाचिया मापा । न संपडेचि जे बापा । तया आणि खपुष्पा । विशेषु काई ? ॥ ७-५३ ॥
मा हे प्रमाणचि नुरवी । आतां आथी हें कोण प्रस्तावी । येणें बोलें ही जाणावी । अज्ञानउखी ॥ ७-५४ ॥
एवं प्रत्यक्ष अनुमान । प्रमाणां भाजन । नहोनि जालें अज्ञान । अप्रमाण ॥ ७-५५ ॥
५१
कारण रूपाने
अभिन्न राहणे
अज्ञान चि ॥११४॥
तर मग इथे
घेण्या नि देण्याचा
या व्यवहाराचा
वाली कोण ॥११५॥
५२
म्हणूनिया घेण्या
देण्याचिया कथा
ही तर व्यर्थता
गमे इथे ॥११६॥
मृगजळातील
मासा जैसा सत्य
तैसेची यथार्थ
वरील हे ॥११७॥
५३
प्रमाणा ते सिद्ध
जी न होय कधी
काय तया प्रती
भावा ऐसे ॥११८॥
तयामध्ये आणि
आकाश पुष्पात
फरकाची बात
नसे मुळी॥११९॥
५४
अज्ञान नुरवी
जर प्रमाणाला
सिद्ध अज्ञानाला
करी कोण ॥१२०॥
ययापरी इथे
अज्ञान अखंड
येतसे घडून
आपोआप ॥१२१॥
५५
तैसे अज्ञानात
प्रत्यक्ष आणिक
अनुमानाधिक
प्रमाण ना ॥१२२
ठरते अपात्र
तरी ते अज्ञान
सतत सांडून
पूर्णपणे ॥१२३॥
********
भावानुवाद :~ डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
No comments:
Post a Comment