Thursday 26 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४ ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २६ रे ३० (अभंग५१ ते५७ )




 अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ४  ज्ञानाज्ञानभेदकथन ओव्या २६ रे ३० (अभंग५१  ते५७   )
 -----------------------------------------------------------------------------------------------------



तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ।
तरी नाहीं हे प्रथा । कवणासि पां ? ॥ ४-२६ ॥
 

जरी काही नाही 
ऐसी ही अवस्था 
कळते सर्वथा 
कुणाला ते५१



शून्यसिद्धांतबोधु । कोणे सत्ता होये सिद्धु ?
नसता हा अपवादु । वस्तूसी जो ॥ ४-२७ ॥
  2७
जेणे होय बोध 
शून्य सिद्धांताचा 
कोणत्या सत्तेचा 
हात तिथे ५२

नसणे पणाचा 
आरोप वस्तूला 
पाहता कळला 
नीट पणे ५३


माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
 2८
मालवून दिवा 
मालविता मरे 
तरी कुणा कळे 
दीप  नाही ५४


कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
 2९

निद्रा भली होती 
कळेल कुणाला 
निद्रेतच गेला 
प्राण जर ५५


घटु घटपणें भासे । तद्‍भंगें भंगू आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥ ३०
घट पणे घट 
तुटता ही घट 
भासतसे घट 
पाहणाऱ्या ५६

आणि घट तोच 
सर्वथा ही नाही
ऐसा कोण पाही 
अभाव हा ५७
 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...