Sunday 29 March 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय४, ज्ञान अज्ञान भेद कथन ओव्या ३१ ते३५(अभंग५८ ते ६६ )




अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय४, ज्ञान अज्ञान भेद कथन ओव्या ३१ ते३५(अभंग५८ ते    ) 
============================================================


म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण ।
नोहूनि असवेंवीण । असणें जें ॥ ४-३१ ॥
 

३१
म्हणुनिया ते हे 
आहे नाही पण 
आत्मा पाहतो न
मुळीसुद्धा ५८

आहे नाही पणा 
अवघ्या सारून 
आहे पणी ज्ञान 
सामावले ५९

परी आणिका कां आपणया । न पुरे विषो हो‍आवया ।
म्हणोनि न असावया । कारण कीं ॥ ४-३२ ॥
 
ज्ञानाचा विषय 
परमात्मा नाही 
कळत कुणाही
कधीच तो ६०

मग तो न सदा
असे म्हणावया 
काय देख  तया 
वाव आहे ६१


जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाहि निमाला । आठ‍उ तया ॥ ४-३३ ।
 ३३
अरण्यी निजला 
कोणी न पाहिला 
स्वतःची तयाला 
स्मृती नाही

परी जिवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ।
हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ ४-३४ ॥

परी तो ची मेला 
ऐसिया बोलाला 
अर्थ ची कसला 
नाही मुळी ६३


तैसे तया सुद्धा 
असणे हे आहे 
बोलणे न साहे 
आहे नाही ६४

 
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणहि मोडे ।
परी नाहीं नोहे फुडे । तें जाणेचि ते ॥ ४-३५ ॥ ३५
उलटून दृष्टी 
पाही स्वतःकडे 
दिठी पण मोडे
जैसे तिचे ६५

परि ती असते 
मुळात राहते 
नच की नष्टते 
शक्ती तिची ६६

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

  https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...