Tuesday 25 August 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या १६ ते२० (अभंग३१ ते ४०)

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६ वा शब्दखंडन ओव्या १६ते २०(अभंग३१ते ४०)
***********

 जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥ 
१६
काय जागणारा 
म्हणे का मी जागा 
निद्रेचिया भोगा 
सोडुनीया  ॥३१॥
तैसे चि स्मरण 
आणि विस्मरण 
स्वरूपी ते जाण
नसे कदा. ॥३२॥

सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥ 

जैसा सूर्य नच 
जाणे कधी रात 
दिवसाची बात 
व्यर्थ तिथे ॥३३॥
असणे होऊन 
राहणे तयास 
अवघा प्रकाश 
अंतर्बाह्य ॥ ३४॥
जैसे वस्तू ठाई 
न च की स्मरण 
आणि विस्मरण 
आपले ते  ॥३५॥

एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥ 

स्मरणास्मरण
ऐसिया परि ते 
नाहीच वस्तू ते 
कदा काळी ॥ ३६ ॥
मग स्मरणा त्या 
शब्दा काय काज
देणे-घेणे व्याज 
कासयाचे ॥३७॥

आणिक येक शब्दें । काज कीर भलें साधे । परि धिंवसा न बंधे । विचारु येथें ॥ ६-१९ ॥ 

आणि एक काम 
शब्द करीत थोर 
बोलण्यास धीर 
नाही परी ॥३८॥

कां जे बोलें अविद्याअ नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे । हें म्हणतखेवो पिसें । आलेंचि कीं ॥ ६-२० ॥ 
शब्द जी अविद्या 
हरपून जाते 
आत्मतत्त्व येते  
हाता ऐसे ॥३९॥
पैसे जरी कोणी 
येथे बोलू जाता 
वेडेपणा माथा  
चिकटतो ॥ ४०॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...