Wednesday 20 May 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ५१ ते५५ (अभंग१०२ते १०८)


 

 

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ५ सच्चिदानंद पदत्रय विवरण ओव्या ५१  ते५५ (अभंग१०२ते  ११०)


॥ न पेरितां पीक जोडे । तें मुडाचि आहे रोकडें । 

 ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥ ५-५१


7

पेरण्या पूर्वीच

पिक मुडी असे

गुढ  बोल ऐसे

उघड हे     ॥ १०२॥


एवं विशेष सामान्य । दोहीं नातळे चैतन्य । 

 तें भोगिजे अनन्य । तेणेंसीं सदा ॥ ५-५२


विशेषा सामान्या  

दोघाही नातळे

चैतन्य वेगळे

भावातीत ॥ १०३॥


सदा  स्व स्थितीत

असे भाव शून्य

सर्वदा अनन्य   

आपल्याशी ॥ १०४॥


 आतां यावरी जे बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें ।  

जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥ ५-५३ ॥

आता या वरती

काही जे बोलणे

ते होय शहाणे 

यया बोले॥१०५॥


ऐसिया बोलणे

बोल न राहणे

तेथे  हरवणे

मौन सुद्धा ॥ १०६॥


एवं प्रमाणें अप्रमाण- । पण केलें प्रमाण । 

 दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥ ५-५४ ॥ 

सारीच प्रमाण

होती अप्रमाण

कराया वर्णन

स्थितीचे या ॥ १०७॥


आणिक सिद्धांत

मागे सरतात

घेऊनी शपथ

न दिसण्याची ॥ १०८॥


 अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ती ।  

येथें उठली पांती । लक्षणाची ॥ ५-५५ ॥


सारी युक्तिवाद

होत असमर्थ

माघारे जातात

चूप होत ॥१०९


आणिक लक्षणे 

खुणा जे सांगत 

तयाची पंगत

उठू गेली ॥ ११०॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://amrutaanubhav.blogspot.com

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...