११वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या ५१ते ५५(अभंग १०८ते ११७) ***********
*****
तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरू । तळहातींचे विंचरू । केंस सुखें ॥ ६-५१ ॥
बागुल बुवाला
धरून मारावे
प्रतिबिंब घ्यावे
पदरात ॥१०८॥
तळ हातीचे ते
केस विंचरणे
करावे सुखाने
जैसे काही ॥१०९॥
घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू । सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ ६-५२ ॥
नसल्या घराला
रागाने फोडावे
नभाचे तोडावे
फुले जैसे ॥११०॥
सशाच्या शिंगाला
धरून मोडावे
ऐसेची करावे
काहीएक॥१११॥
तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू । वांजेचें लेंकरूं । [अरणु सुखें ॥ ६-५३ ॥
कापूर जाळून
काजळ भरून
शाई ती करून
वापरावी ॥११२॥
रत्नदिपकाचे
काजळ धरावे
लग्नाची करावे
वांझ पुत्री ॥११३॥
तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें । मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ ६-५४ ॥
घेऊन चांदणे
कुण्या अवसेचे
पोसो पातळीचे
चकोर वा ॥११४॥
मृगजळातील
बहु जलचर
घेऊन वागुर
पकडावे११५॥
अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें । आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ ६-५५ ॥
अहो सांगा किती
ऐसे हे बोलावे
अविद्या सांगावे
विवरून ॥११६॥
नसल्या असावे
कैसे हे घडावे
अविद्या अभावे
आहे येथे ॥११७॥
इये अभावते
आहे पण देणे
शब्दाने खंडणे
तैसे होय॥११८॥
******
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
****************
No comments:
Post a Comment