Wednesday 23 September 2020

अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९१ते ९५(अभंग १८७ते १९७) ***********

 १९वा भाग
अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ६वा शब्दखंडन ओव्या , ९६ते १००(अभंग १९८ते २०७) 
***********
 
एवं माध्यान्हींची दिवी । तम धाडी ना दिवो दावी । तैसी उपभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ६-९६ ॥ 

मध्यान्हीचा दिवा 
तम ना घालवी 
दिस ना पालवी 
कधीकाळी ॥१९८॥

तैसी या शब्दास 
उभय बाजूची 
काही कुठली ची 
ज्ञप्ती नाही॥१९९॥

आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ 

नसल्या अविद्ये
कैसे ते नाशणे 
कैसे हे घडणे 
असंभव ॥२००॥

आणि आत्मा येथे 
 अरे सदा सिद्ध 
तयाला प्रसिद्ध 
कोण करे ॥२०१॥

ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी । हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ ६-९८ ॥ 

प्रलय उदयी
जैसा हरपला 
ओघ जो चालला 
पाणियाचा ॥२०२॥

तैसा दोन्ही बाजू 
न घडे प्रवेश 
तै शब्द आवेश 
ओसरला ॥ २०३॥

आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं । अर्थता तरि नाहीं । निपटुनियां ॥ ६-९९ ॥

जरी शब्द इथे 
काही उमटले 
आकारी दिसले 
व्यवस्थित ॥२०४॥

परी पाहू जाता 
तयाचा तो अर्थ 
वाचून निरर्थ 
शब्द नाही ॥२०५॥

बागुल आला म्हणितें । बोलणें जैसें रितें । कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ ६-१०० ॥ 

रे बागुलबुवा 
आला रे आला 
म्हणणे बाळाला 
तैसेचि हे ॥२०६॥

धरीले आकाशा
मिया तळहाती 
बोलण्याची रिती 
व्यर्थ जैसी ॥२०७॥

No comments:

Post a Comment

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  . ***** आषाढी एकादशीला पूर्ण हा झाला  अभ्यास चालला  लिहूनिया॥१ योगायोग...