राती म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे । वांदुन सूर्यासवें । शिणणें होय ॥ ८-११ ॥
रात्र आहे तव
आणुनिया दिवे
घरात लावावे
उजेडला ॥२१
पण उजाडता
पुन्हा ते लावणे
व्यर्थची शिणने
आहे जसे॥२२
म्हणोन अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही । आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥ ८-१२ ॥
अज्ञाना सापेक्ष
असते जे ज्ञान
जाताच निघून
दोन्ही नाही ॥२३
म्हणुनिया ज्ञान
अणिक अज्ञान
वाटा या दोन
नाही होती ॥२४
येर्हवीं तर्ही ज्ञान अज्ञानानें । दोहींचि अभिधानें । अर्थाचेनि आनानें । विप्लावलीं ॥ ८-१३ ॥
खरे पाहू जाता
ज्ञान व अज्ञान
अभिधान दोन
असतात ॥२५
आणिक जाणता
अर्थ तो खोलात
दोन्ही हरवत
नाही होती॥२६
जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें । तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ ८-१४ ॥
जैसी की दंपती
शिरची तोडली
आणिक लावली
परस्परा ॥२७
स्वरूप तयांची
नच बदलली
प्राणास मुकली
फुकटचं॥२८
कां पाठी लाविला होये । तो दीपुचि वायां जाये । दिठी अंधरें पाहे । तैं तेचि वृथा ॥ ८-१५ ॥
जर का दीपक
पाठीशी लावला
वायाची तो गेला
जसा काही॥२९
व्यर्थची दिठी ती
जर का समोर
तिच्या तो अंधार
दिसतसे॥३०
🌾🌾🌾 .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵
No comments:
Post a Comment