अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ९वा जीवन्मुक्तदशाकथन ओव्या ,१६ते२० (२८अभंग ते ३८ )
💮💮💮💮💮💮
म्हणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिकांचे हात । घ्यावया जेथ । उजू होती ॥ ९-१६ ॥
म्हणूनिया इथे
शब्द रस आदी
विषय जे होती
पाच मुख्य ॥२८
तयाचे ग्रहण
करण्या प्रवृत
ज्ञानेन्द्रिय हात
जणू होती ॥२९
तेथे संबंधु होये न होये । तव इंद्रियांचें तें नोहे । मग असतेंचि आहे । संबंधु ना ॥ ९-१७ ॥
जरी त्या ठिकाणी
इंद्रिया विषयी
संकर्प जै येई
वा न येई॥३०
जाणीव रूपाने
असे तिथे व्यक्त
आत्मतत्त्व फक्त
अस्तित्वात ॥३१
जिये पेरीं दिसती उशीं । तिये लाभती कीं रसीं । कांति जेवीं शशीं । पुनिवेचिया ॥ ९-१८ ॥
जेवढ्या लांबीची
पेरे ती ऊसाची
तेवढी रसाची
उपलब्धी ॥३२
जेवढ्या कला त्या
असती चंद्राशी
दिसे पौर्णिमेसी
एक झाल्या॥३३
पडिलें चांदावरी चांदिणें । समुद्रीं झालें वरिषणें । विषयां करणें । भेटती तैशीं ॥ ९-१९ ॥
पडे चंद्रावरी
जितुकी चांदणे
चंद्रच ते होणे
आपोआप ॥३४
जितुका पाऊस
पडे सागराती
पाणी पाणीयाती
मिळतसे ॥३५
इंद्रिया विषयी
ऐसी भेट घडे
फरक न पडे
कश्यातही॥३६
म्हणोन तोंडाआड पडे । तेंहि वाचा वावडे । परी समाधी न मोडे । मौनमुद्रेची ॥ ९-२० ॥
बोले जरी काही
तयाची ती वाणी
बोलती न मौनी
तरीसुद्धा ॥३७
समाधी तयाची
मौन त्या मुद्रेची
असे स्थिरत्वाची
सर्वकाळ॥३८
🌾🌾🌾 .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://amrutaanubhav.blogspot.com
🏵🏵
No comments:
Post a Comment