अमृतानुभव, पद्य भावानुवाद, अध्याय ७वा अज्ञानखंडण ओव्या , १०१ ते१०५ (अभंग २२०ते२३३)
101
तया नांव अज्ञान ऐसें । तरी ज्ञान होआवें तें कैसें ? । येर्हवीं कांहींचि असे । आत्मा काई ? ॥ ७-१०१ ॥
ज्ञान व्यवहारा
अज्ञान हे नाव
ज्ञानाचा तो ठाव
कुठे मग ॥२२०
असे वास्तविक
एक आत्मतत्त्व
इथे असे फक्त
ज्ञानरूप ॥२२१
102
कांहींच जया न होणें । होय तें स्वतां नेणे । तरी शून्याचीं देवांगणें । प्रमाणासी ॥ ७-१०२ ॥
जया लागी काही
इथे नच होणे
होऊनिया नेणे
झाले तरी ॥२२२
अवघी प्रमाणे
शपथ घेऊनी
सांगती येउनी
हेचि की ते ॥२२३
आत्मा ऐसा असे
किंवा शून्य आहे
बोलता नच ये
कुणालाही ॥२२४
103
असे म्हणावयाजोगें । नाचरे कीर आंगें । परी नाहीं हें न लागे । जोडावेंचि ॥ ७-१०३ ॥
आहे म्हणू। जावे
तो ती स्थिती नाही
ऐसे असे काही
सदा येथे ॥२२५
म्हणूनिया नाही
म्हणण्यात काही
कारण ते नाही
दिसतसे ॥२२६
(आहे आणि नाही
व्याख्ये पलीकडे
सरळ ते कोडे
असे पाही ॥)२२७
104
कोणाचे असणेंनवीण असे । कोणी न देखतांचि दिसे । हें आथी तरी काईसें । हरतलेपण ॥ ७-१०४ ॥
दुज्या त्या कुणाच्या
असल्या वाचून
आधारा वाचून
आत्मा असे ॥२२८
दुज्या त्या कुणाला
पाहिल्या वाचून
पाहण्या वाचुनी
असे ची तो ॥२२९
तयाचे पाहणे
आणिक असणे
स्वयंसिद्ध ॥२३०
तर मग सांग
म्हणणे हा नाही
मानावे कसे ही
कुणे बोल ॥२३१
105
मिथ्यावादाची कुटी आली । ते निवांतचि साहिली । विशेषाही दिधली । पाठी जेणें ॥ ७-१०५ ॥
कोणी म्हणे नाही
जर काय याला
आरोप साहिला
तयाने तो ॥२३२
आणि कोणी दिली
विशेषण मोठी
तया दिली पाठी
सहजी ची ॥२३३॥
🌾🌾🌾
No comments:
Post a Comment